Wednesday 30 October 2019

एकतेचा संदेश देत धावले औरंगाबादकर…

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद,राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा

औरंगाबाद,दिनांक 31 (जिमाका)- लोहपुरुष,देशाचे माजी उपप्रधानमंत्री, गृहमंत्री सरदारवल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी राष्ट्रीय एकतेचा संदेशदेण्यासाठी  एकता दौड (रन फॉर युनिटी) कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.औरंगाबादेत आज सकाळी क्रांती चौक ते महावीर चौक (बाबा पेट्रोल पंप) पर्यंतएकता दौडचे आयोजन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले होते. या एकता दौडमध्ये नागरिकांचाउत्स्फूर्त प्रतिसाद होता. क्रांती चौक येथे आयोजित कार्यक्रमास सुरूवातीला सरदार वल्लभभाई पटेल तसेच श्रीमती इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला महापौरनंदकुमार घोडेले, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनीपुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सर्व उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनाची शपथदेऊन एकता दौडला मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवली.  तसेच दौडमध्ये सहभागीही झाले.  दौडमध्ये लहान मुलांसह युवक-युवती, पोलीसअधिकारी-कर्मचारी यांच्यासह महसूल, क्रीडा, महानगरपालिका आदीविभागातील अधिकारी- कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.                                                      *विजेत्यांना बक्षीसांचे वितरण*
 तीन टप्प्यात विभागलेल्या एकता दौडमधील सहभागी स्पर्धकांना मान्यवरांनी बक्षीस देऊन गौरविले. पाच कि.मी गटामध्ये प्रथम,द्वितीयआणि तृतीय अनुक्रमे संतोष वाघ, परवेज महेबूब आणि गौतम वाकळे यांनी क्रमांकपटकावला. तीन कि.मीमध्ये राम लिंभारे, ‌ऋषीकेश लिंभारे, साई अंबे यांनी तर दीड कि.मीमध्येपुरूष गटामध्ये अभिषेक निंबाळे, ऋषीकेश  जैस्वाल, अजय वाघ आणि महिला गटामध्ये सुमय्यामहेबूब सय्यद, वैदेही लव्हांडे व आम्रपाली अंभोरे विजेते ठरले. विजेत्यांना मान्यवरांच्याहस्तेचषक देऊन गौरविण्यात आले. तर पाच वर्षीय चिमुकला दानिश आमेर शेख याने स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल त्याचेही कौतुक मान्यवरांनी केले.





No comments:

Post a Comment