Saturday 19 November 2016



जागतिक वारसा जतन करणे
ही काळाची गरज आहे
                 - डॉ.उमाकांत दांगट

        औरंगाबाद,‍दि. 19 : मराठवाड्यातील  ऐतिहासीक स्थळांचा जागतिक वारसा जतन करणे महत्वाचे असून अशा  जागतिक वास्तूंचे संवर्धन झाले पाहिजे असे प्रतिपादन विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी केले. दौलताबाद किल्यात भारतीय पूरातत्व विभागाच्या वतीने जागतिक हेरिटेज सप्ताहाचे  आयोजन करण्यात आले  आहे. या प्रसंगी ते बोलत होते.
            संपूर्ण भारतात भारतीय पूरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे दि. 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान जागतिक हेरिटेज सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाने दौलताबाद येथील ‍किल्यात या सप्ताहाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबडेकर, मराठावाडा विद्यापीठाच्या पर्यटन विभागाच्या माजी प्रा.डॉ. दुलारी, कुरेशी, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक शिवाकांत वाजपेयी ,दौलताबाद येथील देवगिरी विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती निकाळजे, आदी मान्यवर उपस्थित होते.
            डॉ.दांगट म्हणाले की दौलतबाद किल्ला हा अतिप्रचिन वास्तू असून या परिसराचे व वास्तूचे  संवर्धन झाले पाहिजे यासाठी  येथील नागरिकांनी दक्ष राहावे, देशात ऐतिहासीक वास्तूच्या माध्यमातून  सर्व र्धम समभाव ही संकल्पना रुजविली गेली आहे. ऐतिहासीक  वास्तु हया  जगाला शांतता व समतेचा संदेश देणारे आहेत. औरंगाबाद जिल्हा पर्यटन जिल्हा  असून या ठिकाणी मोठया प्रमाणात पर्यटक येतात त्यामुळे येथील ऐतिहासीक वास्तूची महत्व  आहे, अशा वास्तूंचे जनतेने जतन व संवर्धन करून हा वारसा जपला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
             कार्यक्रमात महाराष्ट्रतील स्मारकीय, ऐतिहासीक वास्तुचे छायाचित्र प्रदर्शनाचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले , हे  प्रदर्शन दि. 19 ते 25  नोव्हेंबर 2016 पर्यंत   सकाळी 9 ते 5 या वेळात सर्वासाठी खुले आहे. यांचा सर्वानी लाभ घ्यावा, कार्यक्रमाचे  प्रास्ताविक येथील पुरातत्व विभागाचे सहायक संचालक शिवाकांत वाजपेयी यांनी केले. कार्यक्रमास पर्यटन प्रेमी, दौलताबाद येथील ग्रामस्थ, देवगिरी विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते



.


विभागीय आयुक्त कार्यालयात
इंदिरा गांधी यांना अभिवादन

        औरंगाबाद,‍दि. 19 : दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी त्यांच्या जयंतीनिमित्त आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अपर आयुक्त गोविंद बोडखे यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. आजचा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त या कार्यक्रमास उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अपर आयुक्तांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
            यावेळी उपायुक्त महेंद्र हरपाळकर, वर्षा ठाकूर, पारस बोथरा, सुर्यकांत हजारे, उपजिल्हाधिकारी  शिवाजी शिंदे, नायब तहसिलदार ए. जी. पटवारी  यांच्यासह विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
याप्रसंगी विभागीय आयुक्त कार्यालयातील नायब तहसिलदार ए.जी. पटवारी यांनी इंदिरा गांधी यांच्या जीवनकार्याची माहिती उपस्थितांना दिली.




नहर-ए- अंबरी ऐतिहासिक परिसरात
 हेरिटेज वॉक चे आयोजन
            औरंगाबाद, दि. 19 :- येथील हरसूल रोडवरील नहर-ए- अंबरी या ऐतिहासिक परिसरात आज सकाळी 7 वा हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अपर आयुक्त गोविंद बोडखे, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी आधिकारी मधुकर अर्कड, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक शिवाकांत बाजपेयी, उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, पर्यटन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंखे, शहरातील इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक रमजान शेख, प्रदीप देशपांडे उपस्थित होते.
इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक रमजान शेख  यांनी यावेळी नहर-ए- अंबरी या ऐतिहासिक विहिरी विषयी माहिती देतांना सांगितले की शहर व परिसरात एकून 14 जुन्या ऐतिहासिक विहिरी (नहर) असून नहर-ए- अंबरी त्यापैकी एक आहे. इ.स. 1916 मध्ये मलीक अंबर यांनी ही नहर-ए- अंबरी तयार केली असून या नहर-ए- अंबरीद्वारे त्याकाळी शहराला मोफत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत होता. मालिक अंबर  जुन्याकाळातील अभियंता होते त्यांच्या देखरेखी खाली याचे बांधकाम केले होते. गायीच्या मुख्यासारखे विहिरीचे बांधकाम करून गोमूखातून पाणी येत असे म्हणून याला गायमुख असे म्हणत असत या ऐतिहासिक विहिरीचे संवर्धन केल्यास येथे पर्यटन स्थळ निर्माण होईल, पर्यटकांना यांचे महत्व समजेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी  व्यक्त केली.
            या हेरिटेज वॉक प्रसंगी पुरातत्व विभागाचे सहायक संचालक श्री बाजपेयी  इतिहास अभ्यासक प्रदीप देशपांडे यांनी या विषयी माहिती दिली. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर अर्कड यांनी आभार व्यकत केले. याप्रसंगी परिसरातील नागरिक, पर्यटन वियषक  अभ्यायक उपस्थित होते.