Monday 29 July 2019

मराठवाड्यात 191.88 मि.मी. पाऊस
औरंगाबाद,दि. 29 (विमाका) :- मराठवाड्यात मागील काही दिवसांत ढगाळ वातावरण असले तरी पावसाचा जोर कमी आहे. गेल्या 24 तासात मराठवाड्यात अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे.  विभागात आज सकाळपर्यंत नोंदल्या गेलेल्या आजपर्यंतच्या पावसाच्या एकूण आकेडवारी नुसार सरासरी 191.88 मि.मी  आहे.
जिल्हानिहाय  आजपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. नांदेड 242.28 मि.मी, औरंगाबाद- 232.88 मि.मी, हिंगोली -223.87 मि.मी, जालना - 210.45 मि.मी, परभणी -178.62 मि.मी, लातूर 163.63 मि.मी, उस्मानाबाद 156.67 मि.मी. आणि बीड 126.66 मि.मी.
विभागातील आठही जिल्ह्यातील सकाळपर्यंत मागील चोवीस तासांतील तालुक्यानिहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी दि.1 जूनपासून आजवर पडलेल्या पावसाची सरासरी आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिणामात आहे.
औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद 9.50 (200.00), फुलंब्री 10.75 (276.75), पैठण 9.60 (154.14), सिल्लोड 25.25 (315.94), सोयगाव 26.00 (328.33), वैजापूर 7.40 (203.90), गंगापूर 9.89 (185.89), कन्नड 13.75 (243.00), खुलताबाद 12.67 (188.00). जिल्ह्यात एकूण 232.88 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 5.50 (174.56), बदनापूर 7.20 (213.40), भोकरदन 18.50 (305.88), जाफ्राबाद 9.20 (238.40), परतूर 2.80 (190.28), मंठा 4.75 (199.50), अंबड 5.43 (189.14), घनसावंगी 4.71 (172.43), जिल्ह्यात एकूण 210.45 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 2.25 (157.42), पालम 3.67 (143.42), पूर्णा 4.60 (202.40), गंगाखेड 6.75 (165.75), सोनपेठ 4.00 (185.00), सेलू 3.80 (156.80), पाथरी 2.67 (174.33), जिंतूर 3.33 (192.33), मानवत 3.67 (230.00), जिल्ह्यात एकूण पावसाची नोंद 178.62 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली 4.86 (213.57), कळमनुरी 6.00 (258.75), सेनगाव 5.67 (218.50), वसमत 3.57 (136.29), औंढा नागनाथ 4.50 (292.25). जिल्ह्यात एकूण 223.87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

 नांदेड जिल्हा- नांदेड 5.25 (226.75), मुदखेड 11.00 (295.00), अर्धापूर 3.33 (221.32), भोकर 11.50 (251.75), उमरी 8.33 (260.79), कंधार 7.50 (220.33), लोहा 5.00 (197.03), किनवट 17.71 (278.19), माहूर 11.25 (308.44), हदगाव 9.29 (222.56), हिमायत नगर 17.67 (252.66), देगलूर 12.00 (153.16), बिलोली 11.00 (302.00), धर्माबाद 14.67 (218.67), नायगाव 4.80 (261.60), मुखेड 7.14 (206.29), जिल्ह्यात एकूण 242.28 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा- बीड 8.27 (117.64), पाटोदा 0.25 (147.00), आष्टी 2.43 (132.14), गेवराई 4.70 (103.00), शिरुर कासार 9.33 (94.33), वडवणी 10.50 (110.50), अंबाजोगाई 11.00 (115.00), माजलगाव 6.60 (180.73), केज 1.00 (127.57), धारुर 3.67 (113.33), परळी 15.40 (152.02), जिल्ह्यात एकूण 126.66 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्हा- लातूर 1.00 (115.88), औसा 1.71 (90.57), रेणापूर 5.50 (146.25), उदगीर 6.29 (180.29), अहमदपूर 12.00 (228.17), चाकुर 10.00 (137.60), जळकोट 11.00 (223.50), निलंगा 3.63 (157.25), देवणी 4.00 (186.50), शिरुर अनंतपाळ 0.00 (170.33), जिल्ह्यात एकूण 163.63 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद 0.50 (144.50), तुळजापूर 0.29 (190.57), उमरगा 3.40 (186.40), लोहारा 0.00 (190.00), कळंब 0.50 (132.67), भूम 0.60 (170.10), वाशी 0.00 (148.33), परंडा 0.00 (90.80), जिल्ह्यात एकूण 156.67 मि.मी. पाऊस झाला आहे.
******
औरंगाबाद – जालना स्थानिक प्राधिकारी मतदार संघ
निवडणुकीसाठी 24 तास नियंत्रण कक्ष

औरंगाबाददिनांक 29  – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद-तथा जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत 19 जुलै2019 रोजी घोषित करण्यात आला आहेत्यानुसार व्दिवार्षिक निवडणुकीसाठी 19ऑगस्ट रोजी मतदान होणार आहेनिवडणूक पूर्ण होण्याचा दिनांक 26 ऑगस्ट आहे.
या निवडणुकीसंदर्भातील तक्रारी दाखल करण्याकरिता निवडणुकीची अधिसुचना प्रसिध्द झाल्यापासून म्हणजेच दिनांक 25 जुलै 2019 पासून ते26 ऑगस्ट 2019 पर्यंत कक्ष क्रमांक 611,  सामान्य प्रशासन विभाग, 6 वा मजलाविस्तार इमारतमादाम कामा रोडहुतात्मा राजगुरु चौकमंत्रालय,मुंबई-400032 येथे 24×7 तत्वावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहेया निवडणुकी संदर्भात तक्रार दाखल करावयाची असल्यास या नियंत्रण कक्षात (022-22025059) या दुरध्वनी क्रमांकावर करावीअसे सहमुख्य निवडणूक अधिकारी व उपसचिव यांनी कळविले आहे
*********
                                                                                     
विवेकानंद महाविद्यालयात आज रोजगार मेळावा

औरंगाबाददिनांक 29  – विवेकानंद कलासरदार दलिपसिंग वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रऔरंगाबाद (महाराष्ट्र शासनतसेच नॅशनल करिअर सर्व्हिस ,(श्रम व रोजगार मंत्रालयभारत सरकारयांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, 30 जुलै रोजी सकाळी 10 वाजता विवेकानंद कलासरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयसमर्थनगरऔरंगाबाद येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेमेळाव्यास विविध उद्योजकआणि उद्योजक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून एकूण 859 पदासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेतमेळाव्यास दहावीबारावीआयटीआयडिप्लोमापदवीधर व तांत्रिक पदवीधर तसेच नॉन टेक्नीकल उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे निवड करणार आहेत.
तरी पात्र  इच्छुक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in  संकेतस्थळावर किंवा महाविद्यालयाच्या https;//forms.gle/9ecFWHQfl34oboVZ8 लिंकवर नोंदणीकरुन घ्यावी  मुळ कागदपत्र  बायोडेटाच्या 4 प्रतीसह मुलाखतीस प्रत्यक्ष उपस्थित राहावेअसे आवाहनमहाविद्यालयाचे संचालक डॉ अशोक गायकवाडमार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक एन.एन सुर्यवंशी  नॅशनल करिअर सर्व्हीसचे डॉअनिल जाधवयांनी केले आहेनोंदणीसाठी काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 0240-2334859 संपर्क साधावाअसे सहायक संचालक श्री.सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
*********


                                                                                                   
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होणेसाठी
 दि. 31 जुलै पर्यंत मुदतवाढ
औरंगाबाददिनांक 29  – शासनाने खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयांत राबविण्याचानिर्णय घेतलेला असून या योजनेत कर्जदार  बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 24 जुलै, 2019 अशी होतीतथापि,दिनांक  24 जुलै, 2019 चे शासन निर्णयानुसार खरीप हंगाम 2019 करिता योजनेत कर्जदार  बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची मुदतवाढवून ती दिनांक 29 जुलै, 2019 अशी करण्यात आली होती.
तथापिशेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेता त्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पिक विमायोजना खरीप हंगाम 2019 मध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दिनांक 29 जुलै, 2019 पासून दिनांक 31 जुलै, 2019 पर्यंत पुन:श्च मुदतवाढदेण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.  
       योजनेत सहभागी होण्यासाठी  बँक  `आपले सरकार सेवा केंद्र` (डिजीटल सेवा केंद्रयांचे मार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्जस्विकारण्यात येत आहेततरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहित मुदतीपुर्वी नजिकचे बँक  आपलेसरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.
अधिक माहितीसाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालकजिल्हा अधिक्षक कृषि अधिकारीउपविभागीय कृषि अधिकारीतालुकाकृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँकआपले सरकार सेवा केंद्र (डिजीटल सेवा केंद्रयांचेशी संपर्क साधावाअसे आवाहनकृषीमंत्री डॉअनिल बोंडेयांनी केले आहे.
******