Saturday 31 August 2019

मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन
विभागात 343 मि.मी. पाऊस
अनेक जिल्ह्यांत दमदार पाऊस

औरंगाबाद,दि. 31 (विमाका) :- अनेक दिवसानंतर मागील चोवीस तासांत मराठवाड्यातील अनेक तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावून सुखद धक्का दिला. विभागातील सर्वच जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची नोंद झाली आहे. विभागात एकूण 343.29 मि.मी. पाऊस झाला आहे. औरंगाबाद, जालना, नांदेड जिल्ह्यातील काही मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
मागील चोवीस तासांत औरंगाबाद जिल्ह्यात 22.70 मि.मी. पाऊस झाला. औरंगाबाद तालुक्यातील चितेपिंपळगाव (80.00 मि.मी.) आणि वैजापूर तालुक्यातील गारज (80 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जालना जिल्ह्यात 32.59 मि.मी. पाऊस झाला आहे. जालना तालुक्यातील जालना (75 मि.मी.), पाचनवडगाव (70 मि.मी.), भोकरदन तालुक्यातील भोकरदन (77 मि.मी.), राजूर (79 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परभणी जिल्ह्यात 21.63 मि.मी. पाऊस झाला आहे. परभणी तालुक्यातील झरी बु.(83 मि.मी.) मंडळात अतिवृष्टी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात 17.83 मि.मी. पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात 25.03 मि.मी. पाऊस झाला आहे. कंधार तालुक्यातील कुरूला (70 मि.मी.), उस्माननगर (80 मि.मी.), फुलवळ (80 मि.मी.), लोहा तालुक्यातील कलंबर (92 मि.मी.) आणि कापशी (79 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बीड जिल्ह्यात 16.15 मि.मी. पाऊस झाला आहे. बीड तालुक्यातील पिंपळनेर (95 मि.मी.) मंडळात अतिवृष्टी झाली आहे. लातूर जिल्ह्यात 28.12 मि.मी. पाऊस झाला आहे. चाकुर तालुक्यातील शेळगाव (72 मि.मी.) मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 13.86 मि.मी. पाऊस झाला आहे. उमरगा तालुक्यातील नारगवाडी (77 मि.मी.) मंडळात अतिवृष्टी झाला आहे.
जिल्हानिहाय  आजपर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. औरंगाबाद- 360.22 मि.मी, जालना -317.48  मि.मी, परभणी -312.65 मि.मी, हिंगोली - 407.96 मि.मी, नांदेड 520.83 मि.मी, बीड 202.06 मि.मी. लातूर 334.29 मि.मी, आणि उस्मानाबाद 290.85 मि.मी.
आज सकाळी मागील चोवीस तासांतील पाऊस व कंसात आजपर्यंत झालेला पाऊस याची तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
औरंगाबाद जिल्हा- औरंगाबाद 34.00 (307.90), फुलंब्री 30.25 (358.50), पैठण 35.00 (268.63), सिल्लोड 6.50 (475.69), सोयगाव 8.67 (536.33), वैजापूर 28.40 (319.00), गंगापूर 23.78 (288.00), कन्नड 27.00 (387.63), खुलताबाद 10.67 (300.33). जिल्ह्यात एकूण 360.22 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
जालना जिल्हा- जालना 40.00 (261.19), बदनापूर 45.20 (312.80), भोकरदन 37.38 (433.75), जाफ्राबाद 19.20 (332.80), परतूर 25.16 (312.42), मंठा 18.75 (292.00), अंबड 40.00 (316.57), घनसावंगी 35.00 (278.29), जिल्ह्यात एकूण 317.48 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
परभणी जिल्हा- परभणी 26.75 (282.31), पालम 5.67 (262.33), पूर्णा 34.80 (421.40), गंगाखेड 30.75 (318.00), सोनपेठ 30.00 (309.00), सेलू 15.20 (274.00), पाथरी 11.00 (283.33), जिंतूर 26.17 (305.83), मानवत 14.33 (357.67), जिल्ह्यात एकूण पावसाची नोंद 312.65 मि.मी. झाली आहे.
हिंगोली जिल्हा- हिंगोली 16.86 (376.86), कळमनुरी 2.17 (489.08), सेनगाव 10.83 (368.83), वसमत 18.29 (302.29), औंढा नागनाथ 41.00 (502.75). जिल्ह्यात एकूण 407.96 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्हा- नांदेड 23.13 (528.75), मुदखेड 25.00 (562.00), अर्धापूर 25.00 (445.66), भोकर 2.75 (508.25), उमरी 20.67 (513.79), कंधार 60.83 (493.83), लोहा 54.50 (452.25), किनवट 7.43 (676.76), माहूर 13.00 (666.81), हदगाव 4.86 (466.56), हिमायत नगर 14.67 (570.99), देगलूर 25.00 (387.66), बिलोली 23.80 (554.40), धर्माबाद 34.67 (539.67), नायगाव 41.40 (517.20), मुखेड 23.71 (448.71), जिल्ह्यात एकूण 520.83 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
बीड जिल्हा- बीड 18.91 (210.18), पाटोदा 1.75 (222.50), आष्टी 3.80 (179.14), गेवराई 27.70 (185.00), शिरुर कासार 20.33 (149.67), वडवणी 36.00 (222.50), अंबाजोगाई 16.40 (187.60), माजलगाव 19.17 (286.70), केज 1.57 (166.29), धारुर 11.67 (166.00), परळी 20.40 (247.11), जिल्ह्यात एकूण 202.06 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
लातूर जिल्हा- लातूर 13.25 (216.25), औसा 17.86 (233.57), रेणापूर 22.50 (283.75), उदगीर 31.86 (326.00), अहमदपूर 47.67 (469.83), चाकुर 49.80 (320.60), जळकोट 20.50 (447.50), निलंगा 31.75 (375.88), देवणी 28.67 (361.50), शिरुर अनंतपाळ 17.33 (308.00), जिल्ह्यात एकूण 334.29 मि.मी. पाऊस झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हा- उस्मानाबाद 5.75 (282.25), तुळजापूर 17.57 (382.29), उमरगा 32.00 (382.80), लोहारा 54.00 (427.33), कळंब 1.33 (216.67), भूम 0.20 (241.50), वाशी 0.00 (253.00), परंडा 0.00 (141.00), जिल्ह्यात एकूण 290.85 मि.मी. पाऊस झाला आहे.
******

Thursday 29 August 2019

अटल महापणन विकास अभियान अंतर्गत विविध 
उपक्रमाबाबत जनजागृती लोक संवाद मोहिम प्रारंभ
औरंगाबाद, दि.29, (विमाका) :- अटल महापणन विकास अभियान अंतर्गत विविध उपक्रमाबाबत जनजागृती लोक संवाद मोहिमेचा प्रारंभ झाला, या लोकसंवाद मोहिमे अंतर्गत औरंगाबाद विभागाचा विभागस्तरीय कार्यक्रम विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, औरंगाबाद यांचे कार्यालयामध्ये दि.27 ऑगस्ट रोजी पार पडला. 
या कार्यक्रमाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या, मराठवाडा विभागाचे माहिती संचालक गणेश रामदासी यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था योगीराज सुर्वे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था अनिलकुमार मु.दाबशेडे, जिल्हा पणन अधिकारी उपसरव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, विभागीय कार्यालय औरंगाबाद जिल्ह्यातील उप/सहायक निबंधक, सहकारी संस्था ता.सर्व व जिल्हा व्यवस्थापक, सहकार विकास महामंडळ पुणे उपस्थित होते. 
माहिती संचालक गणेश रामदासी यांनी मार्गदर्शन केले की, सदर अभिनव संस्थांचे उत्पादनाचे ब्रँडींग होणे गरजेचे आहे. सदर संस्थांची माहिती ही फेसबुकवर सुध्दा अद्ययावत करावी जेणे करुन लोक संवाद साधण्यास मदत होईल. तसेच आपले कडील प्रसिध्द असलेली धान्ये जसे ज्वारी, बाजरी इ. हे उत्तर भारतामधील मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे संस्थेच्या मालाची विक्री सदर बाजारपेठेमध्ये केली गेली पाहिजे. 
यावेळी योगीराज सुर्वे यांनी सांगितले की, महाराष्ट्र सहकारी पणन महासंघ, खरेदी विक्री संघ व विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांचे बळकटीकरण करण्यासाठी दिनांक 25 डिसेंबर 2016 पासून राज्यात अटल महापणन विकास अभियान राबविण्यात येत आहे. खरेदी विक्री संघ व विविध कार्यकारी सहकारी संस्थांना नाविण्यपूर्ण उपक्रम/व्यवसाय सुरू केले आहेत. ही कामे विविध प्रसारमाध्यमांतून सहकारी संस्था शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट, शेतकरी व सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचविणे गरजेचे आहे, जेणेकरुन सहकारी संस्थांनी सुरू केलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांचा लाभ लोकांना मिळणे व त्यासोबतच, आर्थिकदृष्ट्या सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी मदत होईल. राज्यात 5000 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे सक्षमीकरणाचे उद्दिष्ट आहे.
औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली हे चार जिल्हे आहे. जानेवारी 2019 पर्यंत सदर उपक्रमांतून केलेल्या कामांची माहिती पुढील प्रमाणे आहे. औरंगाबाद विभागात एकूण 31 तालुके असून प्रत्येक तालुक्यात पणन व्यवस्थेतील 15 संस्था असे एकूण 465 संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी VSTF मधील 1000 गावांपैकी संस्था याप्रमाणे निवडलेल्या संस्था संख्या 19 आहे. विभागातील Business Development Plan (व्यवसाय विकास आराखडा) तयार केलेल्या संस्थांची संख्या 84 आहे. औरंगाबाद विभागातील पणन व्यवस्थेतील निवड केलेल्या संस्थांपैकी Royal Agro पार्टनर संस्थांची सामंजस्य करार (MOU) केलेल्या संस्था 369 आहे. औरंगाबाद विभागातील नवीन व्यवसाय केलेल्या 84 संस्थांनी एकूण व्यवसायात झालेली गुंतवणूक रुपये 204.96 लाख इतकी झालेली आहे. नवीन व्यवसायात आजपर्यंत झालेली उलाढाल रुपये 83.42 लाख इतकी झालेली आहे. नवीन व्यवसायापासून संस्थेला मिळालेला एकूण उत्पन्न रुपये 41.44 लाख इतके झाले आहे. नवीन व्यवसायातील संस्थेला मिळालेला निव्वळ नफा रुपये 29.33 लाख इतका झालेला आहे. या माध्यमातून 145 रोजगार निर्मिती झालेली आहे. अटल महापणन विकास अभियानाच्या प्रथ्ज्ञम व द्वितीय वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांना अटल अटल महापणन पुरस्कार देण्यासाठी विभाग समितीने खरेदी विक्री संघ व जिल्हा समितीने विविध कार्यकारी सेवा सहकार संस्थांची प्रथम, द्वितीय व तृतीय अशी संस्थांची निवड करुन पात्र संस्थांना प्रथम वर्ष सन 2016-17 व द्वितीय वर्ष सन 2017-18 मध्ये अटल महापणन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. उपरोक्त उपक्रमातून पणन व्यवस्थेतील सहकारी संस्थांसाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे (MCDC) यांचे मार्फत अटल अर्थसहाय्य योजना राबविण्यात आली असून या माध्यमातून औरंगाबाद विभागातील जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था औरंगाबाद,जालना, परभणी, व हिंगोली यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहकारी संस्थांकडून प्राप्त झालेले अर्थसहाय्याचे प्रस्ताव महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे यांना सादर केले आहे. कॉप शॉप-शहरी सहकारी हौसिंग सोसायटी, मार्केटिंग फेडरेशन, ग्रामीण सहकारी संस्था, इतरचे कॉप शॉपची माहिती प्रपत्र-अ व प्रपत्र-ब मध्ये देण्याचे सूचना सर्व जिल्हा उपनिबंधक यांना देण्यात आल्या आहेत. 

Monday 26 August 2019


अन्न व्यावसायिकांसाठी अन्न प्रशासन विभागाचे आवाहन
औरंगाबाद, दि.26 : अन्न व्यावसायिक परवाना, नोंदणी नसताना ‍किंवा त्याची मुदत संपलेली असताना अन्न व्यवसाय करतात. विना परवाना अन्न व्यवसाय करणे कायद्यान्वये गुन्हा आहे. तसेच बरेचशे अन्न व्यावसायिक चुकीच्या संवर्गात अन्न परवाना घेऊन व्यवसाय करतात. त्याअनुषंगाने अन्न व  औषध प्रशासन औरंगाबाद कार्यालयातर्फे सर्व अन्न व्यावसायिकांनी 30 सप्टेंबर 2019 पूर्वी https://foodlicensing.fssai.gov.in/knowfssailicense/  या url वर त्यांचे पात्रता, परवाना status,  परवान्यात नमूद अन्न पदार्थाबाबत खात्री करावी व त्याअनुषंगे नवीन परवान्यासाठी , फेरबदला करता अर्ज दाखल करावा, असे आवाहन  सह आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन यांनी  केले आहे.
अन्न व्यावसायिक ज्याच्याकडे परवाना असणे आवश्यक असताना नोदंणी घेऊन व्यवसाय करतात. ज्यांच्याकडे परवाना नाही ‍किंवा  त्यांच्या परवान्याची मुदत संपलेली आहे. अन्न व्यावसायिक परवाना नूतनीकरण करणे आवश्यक असताना दंड वाचविण्यासाठी  नवीन परवाना घेतला आहे.  उत्पादक, प्रक्रिया करणारे अन्न व्यावसायिक अन्न पदार्थ परवान्यात नूमद नसणे यासाठी विशेष मोहिम विभागामार्फत राबवण्यात येणार असून‍ दिनांक 01 ऑक्टोबर 2019 पासून पुढे अंमलबजावणी प्राधिकरणाकडून कर्तव्यात कसूर अन्न व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सह आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन यांनी कळविले आहे.   
******

झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी
प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
औरंगाबाद, दिनांक 26  - डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना सन 2019-20 अंतर्गत 31 ऑगस्ट 2019 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्या करीता शासन निर्णय व आवश्यक कागदपत्राची यादी https:mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आहे. इच्छुक संस्थाचालकांनी मदरसांचे परिपूर्ण प्रस्ताव शासन निर्णयातील अटी व शर्ती नुसार जिल्हाधिकारी कार्यालयात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे इच्छुक मदरसा चालकांना केले आहे.
*****

अल्पसंख्यांक बहुल शाळांना पायाभूत सुविधा
अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन
औरंगाबाद, दिनांक 26  - अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांचेमार्फत सन 2019-20 या वर्षासाठी जिल्ह्यात अल्पसंख्यांक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्यागिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी अनुदान ही योजना राबविण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.
या योजअंतर्गत प्रस्ताव सादर करण्याकरिता शासन निर्णय व आवश्यक कागदपत्रांची यादी  https:mdd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक संस्थाचालकांनी शाळांचे परिपूर्ण प्रस्ताव शासन निर्णयातील अटी व शर्ती नुसार जिल्हाधिकारी कार्यालयात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे इच्छुक शाळेच्या संस्थाचालकांना करण्यात येत आहे.
******

कनिफ फातेमा हबीबखॉन मृत्यूप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून
उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती
          औरंगाबाद, दिनांक 26  -  न्यायालयीन बंदी क्र.2798/2019 मयत कनिफ फातेमा हबीबखॉन यांचे निधन झालयामुळे व कनिफ बंदी असल्याने त्याची मृत्यूची दंडाधिकारी चौकशी करणे गरजेचे आहे. म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी औरंगाबाद फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 नुसार, उपविभागीय दंडाधिकारी औरंगाबाद यांची दंडाधिकारी चौकशी करणे कामी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
औरंगाबाद उपविभागीय दंडाधिकारी यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 प्रमाणे अधिकार राहतील. तसेच उपविभागीय दंडाधिकारी औरंगाबाद हे मृत्यूचे कारण, मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, दंडाधिकारी यांचा निर्णय, निष्कर्ष या मुद्यावर चौकशी करतील, असे जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केले आहे.
******

जिल्हाधिकारी कार्यालयात
3 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन
औरंगाबाद, दिनांक 26 - प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येतो.   सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन दि. 3 सप्टेंबर रोजी दु. 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविले आहे.
लोकशाही दिनामध्ये  पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक (ग्रामीण), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, परिवहन महामंडळ, जिल्हा उपनिबंधक, कृषी विभाग, पाणी पुरवठा अधिकारी उपस्थित राहतील. या विभागातील तक्रारी संबंधांत निवेदने, अडीअडचणीबाबतचे तक्रार अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन प्रतीत विहित नमुन्यात सादर करावा. तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे. अर्जदारांनी तालुकास्तरीय लोकशाही दिनात तक्रार अर्ज सादर करुन त्याची पोचपावती जिल्हास्तरीय लोकशाही दिनात सादर करण्यात येणाऱ्या अर्जासोबत जोडावी. न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्वी, अपिल्स, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबींचा यात समावेश नसावा. त्रयस्थांमार्फत अर्ज पाठवू नये. तक्रारदारांनी, निवेदनकर्त्यांनी स्वत: सकाळी 11 ते दु. 1 वाजेपर्यंत तक्रार, निवेदन दाखल करावे व लोकशाही दिनात उपस्थित रहावे, असेही जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
                                               *******

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा
प्रवेशिका पाठविण्यासाठी 16 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
औरंगाबाद, दि.26  :- शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 15 नोव्हेंबर 2019 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात ल्या होत्या. परंतु राज्यातील काही जिल्ह्यांतील पूरस्थिती पाहता तसेच या जिल्ह्यांतील जनजीवन सुरळीत होण्यासाठी अजून कालावधी लागणार असल्याने राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका भरण्याची मुदत दिनांक 16 सप्टेंबर पर्यंत वाढविण्यात येत आहे.
             59 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक 15 नोव्हेंबर, 2019 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी हिंदी, संगीत संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी जानेवारी 2020 पासून प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.
         नाट्य स्पर्धेकरीता रु.3,000/- इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल.
            नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवरनवीन संदेशया मथळयाखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 16 सप्टेंबर 2019 पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात.
1)     मुंबई, कोकण नाशिक विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-32 (022-22043550) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
2)     पुणे महसूल विभागातील संस्थांनी, सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक-4, विमानतळ रोड, पुणे (7588091301) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
3)     औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रुम नंबर-02, एमटीडीसी बिल्डिंग, गोल्डी टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औंरगाबाद-431005 (0240-2339055) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
4)   नागपूर अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाईन, नागपूर-440001 (0712-2554211) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.
            विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशी भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची सर्व स्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी.
            स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल. नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्याच्या प्र. संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांनी कळविले आहे.