औरंगाबाद – जालना स्थानिक प्राधिकारी मतदार संघ
निवडणुकीसाठी 24 तास नियंत्रण कक्ष
औरंगाबाद, दिनांक 29 – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद-तथा जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील व्दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत 19 जुलै2019 रोजी घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार व्दिवार्षिक निवडणुकीसाठी 19ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. निवडणूक पूर्ण होण्याचा दिनांक 26 ऑगस्ट आहे.
या निवडणुकीसंदर्भातील तक्रारी दाखल करण्याकरिता निवडणुकीची अधिसुचना प्रसिध्द झाल्यापासून म्हणजेच दिनांक 25 जुलै 2019 पासून ते26 ऑगस्ट 2019 पर्यंत कक्ष क्रमांक 611, सामान्य प्रशासन विभाग, 6 वा मजला, विस्तार इमारत, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय,मुंबई-400032 येथे 24×7 तत्वावर “नियंत्रण कक्ष” स्थापन करण्यात येत आहे. या निवडणुकी संदर्भात तक्रार दाखल करावयाची असल्यास या नियंत्रण कक्षात (022-22025059) या दुरध्वनी क्रमांकावर करावी, असे सहमुख्य निवडणूक अधिकारी व उपसचिव यांनी कळविले आहे
*********
विवेकानंद महाविद्यालयात आज रोजगार मेळावा
औरंगाबाद, दिनांक 29 – विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद (महाराष्ट्र शासन) तसेच नॅशनल करिअर सर्व्हिस ,(श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, 30 जुलै रोजी सकाळी 10 वाजता विवेकानंद कला, सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, समर्थनगर, औरंगाबाद येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. मेळाव्यास विविध उद्योजकआणि उद्योजक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून एकूण 859 पदासाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. मेळाव्यास दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर व तांत्रिक पदवीधर तसेच नॉन टेक्नीकल उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे निवड करणार आहेत.
तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर किंवा महाविद्यालयाच्या https;//forms.gle/ 9ecFWHQfl34oboVZ8 लिंकवर नोंदणीकरुन घ्यावी व मुळ कागदपत्र व बायोडेटाच्या 4 प्रतीसह मुलाखतीस प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहनमहाविद्यालयाचे संचालक डॉ अशोक गायकवाड, मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक एन.एन सुर्यवंशी व नॅशनल करिअर सर्व्हीसचे डॉ. अनिल जाधवयांनी केले आहे. नोंदणीसाठी काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या दूरध्वनी क्र. 0240-2334859 संपर्क साधावा, असे सहायक संचालक श्री.सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
*********
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होणेसाठी
दि. 31 जुलै पर्यंत मुदतवाढ
औरंगाबाद, दिनांक 29 – शासनाने खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्हयांत राबविण्याचानिर्णय घेतलेला असून या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याची अंतिम मुदत दिनांक 24 जुलै, 2019 अशी होती. तथापि,दिनांक 24 जुलै, 2019 चे शासन निर्णयानुसार खरीप हंगाम 2019 करिता योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्याची मुदतवाढवून ती दिनांक 29 जुलै, 2019 अशी करण्यात आली होती.
तथापि, शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेता त्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री पिक विमायोजना खरीप हंगाम 2019 मध्ये शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दिनांक 29 जुलै, 2019 पासून दिनांक 31 जुलै, 2019 पर्यंत पुन:श्च मुदतवाढदेण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व `आपले सरकार सेवा केंद्र` (डिजीटल सेवा केंद्र) यांचे मार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्जस्विकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळणेस्तव विहित मुदतीपुर्वी नजिकचे बँक व आपलेसरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.
अधिक माहितीसाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुकाकृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँक, “आपले सरकार सेवा केंद्र” (डिजीटल सेवा केंद्र) यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहनकृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे, यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment