Sunday 3 November 2019

कानडगाव, गारजमध्ये पीक नुकसानीची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी


कानडगाव, गारजमध्ये पीक नुकसानीची
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी
रोहयो मंत्री क्षीरसागर,खोतकर यांचीही उपस्थिती
औरंगाबाद, दिनांक 3 (जिमाका) - कन्नड तालुक्यातील कानडगाव,   वैजापूर तालुक्यातील गारजमध्ये गावातील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, रोजगार हमी योजना मंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, आमदार संदिपान भुमरे, आमदार उदयसिंह राजपूत, आमदार रमेश बोरणारे, आमदार अब्दुल सत्तार, माजी खासदार चंद्रकांत खैरे आदी उपस्थित होते.
परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचे नुकसान झाले. शासनाने पिकांची नुकसान भरपाई त्वरित द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी यावेळी श्री. शिंदे यांच्याशी संवाद साधताना व्यक्त केली. कानडगाव येथे मोगल कुटुंबीय व गारज येथे लालचंद राजपूत यांच्या शेतात श्री. उद्धव ठाकरे यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधला, तसेच परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांना धीर दिला. या परिसरातील शेतकरी काशीनाथ जाधव, अशोक गाडेकर, प्रभाकर जाधव यांनी शासनाने आम्हाला लवकर मदत द्यावी, अशी मागणी केली.




No comments:

Post a Comment