Thursday 25 July 2019

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी
२९ जुलै पर्यंत मुदतवाढ

औरंगाबाद, दिनांक २५  – शासनाने खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेण्यासाठी अंतिम मुदत २४ जुलै होती. तथापि २४ जुलैच्या शासन निर्णयानुसार खरीप हंगाम २०१९ करिता योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्यास २९ जुलै पर्यंत मुदत वाढविण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.
योजनेत सहभागी  होण्यासाठी बँक व ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (डिजिटल सेवा केंद्र) यांच्या मार्फत बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यास्तव विहित मुदतीपूर्वी नजीकच्या बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह तसेच आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा.
अधिक माहितीसाठी तत्काळ नजीकच्या कृषी सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँक, ‘आपले सरकार सेवा केंद्र’ (डिजिटल सेवा केंद्र) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केले आहे.
****

No comments:

Post a Comment